पोस्ट्स

दुसरी बाजू

सध्या नाशकात सर्वञ कुंभमेळ्याचीच चर्चा सुरु आहे . जे योग्य ही आहे . बारा वर्षांनी येणारा मोठा उत्सव आहे हा .तो मोठ्या प्रमाणात साजरा केला गेलाच पाहिजे यात वादच नाही . माञ त्या वेळेस सुध्दा आपली नजर भविष्याकडे असली पाहिजे . आज नाशकातील मोठ्या धूमधडाक्यात सुरु झालेले ग्रुह निर्माण प्रकल्प अडचणीत सापडले आहेत. ते भविष्यात मोठ्या समस्या निर्माण करू शकतात . घरांच्या किमती वाढल्यामुळे तेथील अनेक सदनिका विकल्या गेलेल्या नाहीत . या रिकाम्या पडलेल्या सदनिका भविष्यात येणार्या आर्थिक मंदीची तर चाहूल देत नाहीना ? याचा विचार करण्याची वेळ जवळ येत चालली आहे . एल बी टी अंशत: रद्द झाल्याने( एल बी टी सरसकट रद्द न होता विहीत रकक्मेपेक्षा अधिक उलाढाल असणार्याना असल्याने अंशत:) आता उत्पनाचा मुख्य स्ञोत खरेदी व्रिकी आहे तिथे अशी स्थिती असेल तर बघा सटवीच्या मनात काय काय योजना आहेत ? आधीच दुष्काळामुळे शेती फारशी उत्पन देणारी राहिलेली नाही . औद्योगिक क्षेञातही मन प्रसन्न ठेवणारी स्थिती आहे असे मला तरी वाटत नाही . नाशिक च्या सातपूर आणी अंबड या उपनगरातील औद्योगीक वसाहतीत नूसता फेरफटका मारला तरी परीस्थितीचा अंदाज...

अजून किती वीर बापू गायधनी

ज्येष्ठ इतिहास तज्ञ निनाद बेडेकर आणी ज्येष्ठ ग्राहक संरक्षण क्षेञातील नेते बिंदुमाधव जोशी यांना विनम्र श्रध्दांजली मुंबई मधील अग्नी प्रलयात म्रुत्युमुखी पडलेल्या व्यक्तीना विनम्र आंदरांजली अजून किती वीर बापू गायधनी ? मुंबईत शनिवारी गोकूळ या ईमारतीला सायंकाळी साडेचार ला मोठ्या प्रमाणात आग लागली जी विझवायला 11तास लागले यात वित्तहानी व जिवीतहानीपण झाली मी ज्या नाशकात बसून हे लिहीत आहे त्या नाशकात पण अनेक प्राणघातक आगी लागलेल्या आहेत किंबहूना नाशिकच्या अग्निशामक दलाचे नामकरण ज्या वीर बापू गायधनी यांचा नावाने आहे त्यांना सुध्दा वीरमरण अग्नी प्रलयामूळेच आले होते ही गोष्ट विचारात घेणे आवश्यक आहे आग लागणे टाळता येणे अशक्यप्राय असले तरी जिवित हानी टाळणे शक्य आहे असे मला वाटते त्यासाठी पुढील गोष्टी करणे आवश्यक आहे असे मला वाटते मुंबई मधील आग ज्या भागात लागली त्या भागात पिंपरी चिंचवड किंवा सध्या पुणे महानगरपालीकेत येवू घालणार्या गावांमध्ये गाजत असलेल्या अनधिक्रुत बांधकामाचा प्रश्न निर्माण झाला नव्हता फक्त अरूंद रस्ते होते तरी जीवीतहानी झाली पिंपरी चिंचवड पुणे भागातील अनधीक्रुत बांधकामे नियमबाह्...

सुक्षीतांचा अडाणीपणा

दिव्य मराठीच्या पञकार प्रियंका डहाळे यांच्या आत्म्यास शांती लाभो ओम शांती शांती शांती सुशिक्षीतांचा अडाणीपणा नाशकातील ही गोष्ट असली तरी पळसाला पाने तीनच या म् हणीप्रमाने आपण ही गोष्ट कोणत्याही भारतातील ठिकाणी लावू शकतो याची खात्री बागळ्यास हरकत नसावी असी ही गोष्ट आहे तर एका संध्याकाळी मी माझ्या मिञांबरोबर नाशिक च्या मेन रोड वर सायंकाळच्या सुमारास चाललो होतो (मी ज्याठिकाणाहून चाललो होतो ती मार्केट प्लेस आहे आणी जूनी असल्याने अर्थातच अरुंद आहे गर्दीचा वेळी पायी चालण देखील ञासदायक होण्याची ती जागा आहे )अचानक एक लांबट कार कर्णकर्कश हॉन वाजवत जावू लागली ती कार जवळून जाताना आम्ही सहज कारमध्ये डोकावले तर कारमध्ये फक्त दोन डोकी होती त्याचा एकंदरीत दिसण्यावरून ती बडी असामी वाटत होती याला सुशिक्षितप णा म्हणायचा का ? गर्दीचा ठिकाणी जिथे जेमतेम टु व्हीलर जाईल तिथे समस्त समाजाला त्रास होइल असे वागणे कोणत्या सुशिक्षितपणाचा व्याखेत बसते माझा तरी अशा अनुभव आहे की तथतकीत गावंढळ समजले जाणारे लोकच अधीक सुशिक्षित असतात माणूसकी असणारे लोक असतात तर सोकॉल्ड लई भारी वर्ग अशिक्षित असावेत अस...