पोस्ट्स

2016 पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

टोल नाका जीव वाचण्याचे साधन

इमेज
दिनांक 25 मे रोजी  पहाटे मुंबई  पुणे एक्सप्रेस हायवेवर पुण्यातील नामवंत बांधकाम व्यवसाईक दि एस कुलकर्णी यांच्या गाडीला अपघात झाला त्यात त्यांचा चालकाचा जागीच मृत्यू झाला .याच महामार्गावर भक्ती बर्वे आनंद अभ्यंकर यांचा मृत्यू झाला होता (आज भारतात सर्वाधिक मृत्यू हे हार्टफेल आणि रस्ते अपघात या दोन कारणाने होत आहेत . ) या अपघातामागे रस्त्याचा उभारणीतील दोषांचा उहापोह माध्यमांव्दारे होत आहेत . रस्ते उभारणीतील हे दोष दुरुस्त होतीलच पण त्याला काही कालावधी द्यावाच लागेल लगेच करायचे उपाय लक्षात घेतल्यास आपणास टोल नाक्याचे महत्व दूर्लक्षून चालणार नाही , आपणास दोन टोल नाक्यातील अंतर माहिती असतेच ते अंतर सूरक्षीत पणे पार करण्यासाठी किती वेळ लागेल हेही आपण सांगू शकतो . समजा तो कालावधी य आहे आता आपल्याला एकच करायचे .ते म्हणजे एका टोलनाक्यावरुन दूसर्या टोरलनाक्यावर जाण्यासाठी क्ष रुपये टोल  असेल तर य कालावधीत पोहचणार्या वाहनांना टोल मधून काही प्रमाणात सवलत द्यायची तर य कालावधी पेक्षा कमी काळात हे अंतर पार करण्यार्या वाहनांना क्ष या रक्कमेच्या चार ते पाच पट टोल भरायला लावल्यास लोक ...

जाने क्यू ?

इमेज
आपला भारत हा अनेक अजीब गोष्टिने भरलेला देश आहे व्यक्ती हा पण यातीलच एक घटक काय एक एक सॉलिड स्वाभावाचा गोष्टी असतात ! मला एटीम मशीनच्या वेळेस आणी किराणा दुकानात हा प्रकार खुप वेळेस अनुभवयाला मिळतो लोक कसेही दूसर्याचा विचार न करता उभे असतात पहिल्यांदा एटीम च्या विचार करू मला अनेकदा एटीम पाशी हा अनूभव आला आहे इतरांना हा अनुभव न आलेला असल्यास त्यांनी स्वत:पुण्यवान समझावे मी एटीम मधून पैसे काढताना बाहेर आल्यावर मला असे जाणवते की लोक अनेकदा दरवाज्यातच  उभे असतात जणू आतील व्यक्तीने उंच उडी मारुन बाहेर पडावे किवा त्या व्यक्ती हवेच्या असून सरळ चालत  गेले तर आपण त्या व्यक्तीमधून बाहेर पडू अशा या व्यक्तीचा समज का असतो कोण जाणे आतील व्यक्तीला बाहेर पण पडता येवू नये अश्या प्रकारे त्या त्या का उभे राहतात कोण जाणे इतरांना कदाचित चांगले अनूभव असतील माझा माञ या बाबतीत फारशा चांगला अनुभव नाही हे माञ नक्की मला येणारा दुसरा ञासदायक अनुभव म्हणजे किराणा दुकानाच्या कांउटरपाशी तिथे एकाव्यक्तीचे काम असते माञ काही काम नसताना लोक झुंडीने उभे असतात की नव्या माणसाला खुप गर्दी वाटून त्याने बाजूला उ...

माते नर्मदे

इमेज
नूकतेच मी ' दत्तप्रसाद दाभोळकर' लिखीत " माते नर्मदे "हे पुस्तक वाचले .पुस्तक सुप्रसिध्द "सरदार सरोवर " या विषयावर आधारीत असून पुस्तक सरदार सरोवराच्या बाजूने मतप्रदर्शन करते . जे मेधा पाटकर अमिर खान यांच्यख आंदोलनामुळेतयार झालेल्या  आपल्या पारंपारिक संकल्पनेला पुर्णपणे छेद देणारे आहे .  पुस्तकात अनेक आर्थिक संकल्पना , पर्यावरणीय संकल्पना स्पष्ट करून सांगितल्या असल्या तरी पुस्तकाची भाषा सहज सोपी वापरल्याने पुस्तक कंटाळवाणे न बनता रंजक झाले आहे . जे वाचताना सहजतेने ठाव घेते . पुस्तकाचा पाया ,हे धरण होणे पाश्च्यातांच्या आर्थिक साम्राजवादाचा पाया हलवणारे असल्याने ते पर्यावरणाचा बागुलबुवा उभा करत असून या संस्थांना परदेशी संस्थेकडून वित्तसाह्य होते हा आहे .जगात या पेक्षा मोठी धरणे झाली असून पाश्चात्य राष्ट्रात अनेक प्रकारे पर्यावरणाची हानी होते . माञ ती राष्ट्रे भारताला त्याच घटकाचा आधार घेत प्रगती करण्यापासून रोखतात .हा आहे . पुर्वी उभारलेले मोठे प्रकल्प हे खोरे निहाय अभ्यास करुन उभारलेले नसल्याने फारसे उपयोगी पडलेले नाहीत . नर्मदा नदीत सरदार सरोवरा अंतर्गत...

जागतिक कृषी पर्यटन दिना निमित्य

इमेज
जागतिक कृषी पर्यटन दिना निमित्य फिरायला कोणाला आवडत नाही ? आपल्यापैकी प्रत्येकजण कधीना कधी फिरायला गेलेला असतोच . कोणी धार्मिक दृष्टीने पुण्यसंचय करण्यसाठी  फिरतो . कोणी नविन अनुभव घेण्यासाठी फिरतो .कोणी स्वतःचे आरोग्य निरोगी राहावे , मन उठ्याहित राहावे म्हणून फिरतो . या विविध ऊद्देशातून त्याचे विविध प्रकार पडतात उदा वैद्यकीय पर्यटन , दुर्गभ्रमंती पर्यटन ,धार्मिक पर्यटन , यातीलच एक म्हणजे कृषी पर्यटन हा होय . याची जगात विविध भागात प्रकारे व्याख्या केली जाते .  या सर्व व्याख्यांचा सार काढल्यांस आपणास असे म्हणावे लागते की निसर्गासी साधात्म्य साधाणारे पर्यटन म्हणजे कृषी पर्यटन होय  आपल्या भारतात जवळजवळ 65% भाग ग्रामीण आहे . आपल्या भारताची खरी ओळख होते ती ग्रामीण भागातून या ग्रामीण जिवनाची ओळख करुन घेण्यासाठी केले जाणारे पर्यटन म्हणजे कृषी पर्यटन .. तर या ग्रामीण भारतासाठी केले जाणारे कृषी पर्यटन जगाला समजावे म्हणून एका विशेष मोहिमे अंतर्गत Agri Tourism  Development cooperation  ( ATDC )या संस्थेमार्फत ईसवी सन 2008पासून साजरा करण्यात येणारा दिवस म्हणजे जागतिक कृ...

जागतिक पुस्तक दिनाच्या निमित्याने

इमेज
आज २३ एप्रिल अर्थात जागतिक पुस्तक दिन इंग्रजी साहित्यातील एक महान साहित्यीक शेक्सपियर  याचा स्मरणार्थ हा दिवस साजरा केला जातो आज या साहित्यकाराची जयंती(Birth anniversary ) आणी पुण्यस्मरण (Death anniversary )दिवस सुध्दा आज पुस्तकाचे विश्व खुप मोठ्या प्रमाणात विस्तारले आहे अॉडीयो बूक ई बुक्स किंवा पारंपारिक छापील पुस्तके आदी प्रकारात सध्या  सध्या पुस्तके वाचायला उपल्बध आहेत पुर्वी न चर्चिल्या गेलेल्या अनेक विषयावर सध्या पूस्तके निघत आहेत मराठीच्या संदर्भात बोलायचे झाल्यास नॉनफिक्शन (मराठीत ज्याला ललीत साहित्य म्हणतात) पुस्तकांचे विश्व फिक्शन  ( मराठीत ज्याला वाङमय साहित्य म्हणतात )पुस्तकांपेक्षा अधिक प्रमाणात विस्तारत आहे मराठीत अॉडीयो बुक हा प्रकार अजून तरी फारसा प्रचलीत नाही असे माझे निरीक्षण आहे माझे निरीक्षण परीपूर्ण असेलच असे नाही त्याच प्रमाणे ईबुक हा प्रकार सुध्दा मराठीत स्थिरावतो आहे पुस्तकांचे विश्व खरोखरच अनभूत आहे त्यातील मजा औरच आहे अनेक प्रसिध्द व्यक्तीनी त्याचा वाटचालीत पुस्तकांचे महत्व सांगितलेलच आहे  तर पुन्हा एकदा जागतिक पुस्तक दिनाचा शुभेच्छा दे...

मानसिक आरोग्य एक दृलक्षीत घटक

इमेज
मानसिक आरोग्य एक दृलाक्षित घटक सध्याच्या काळातील अत्यंत ज्वलंत विषय म्हणजे मानसिक आरोग्य हा होय .सध्याच्या अत्यंत ताण तणावाच्या काळात ज्या कोणत्या प्रकारच्या विकाराने सर्वाधिक लोक पिडीत असतील तर ते आहेत विविध मानसिक रोग . मी विविध हा शब्द वापरतोय . हे लक्षात घ्या , कारण सर्वसाधारणपणे मानसिक रोग म्हंटले की फक्त छिन्नमानसिकता ( स्कीझोफेनिया ) हाच रोग लोकांच्या नजरेस येतो . बाकीचे काही रोग हे मानसिक रोग आहेत हेच त्यांचा लक्षात येत नाही. अनेक मानसिक समस्या या विक्षिप्त स्वभाव या सदराखाली झाकल्या जातात ज्याच्यावर उपचार केल्यास त्या सहज बऱ्या होऊ शकणाऱ्या असतात मानसिक आरोग्याबाबत लोकांच्या  गैरसमज म्हणजे समुपदेशक (consular ) आणि मनोसोपचार तज्ञ यात होणारी लोकांची गलत . लोकानां दोघांतील फरकच सहज माहिती नसतो . लोक दोघाना एकेच समजतात .मानसोपचार तज्ञ हे एम बी बी एस + एम दि सायको हे क्षिक्षण झालेले असतात .आणि वैद्यकीय औषध तेच देवू शकतात समुपदेशकांना औषधाबाबत काहीच अधिकार नसतात तर समुपदेशक समुपदेशनाच्या कोर्स झालेले असतात मुख्यत: हा कोर्स एम ए मानाशात्र झालेले करतात मानसिक रोगांच्य...

भ फक्त आणि फक्त भाकरीचा भावनेचा कदापि नव्हे

इमेज
सध्या नागपुरी वडाभात खाणार्या काहि व्यक्तींच्या मतांमुळे मराठी जगत ढवळून निघत आहे . महाराष्ट्राच्या विभाजनासंबधी त्यांनी सांगितलेली मते काहि जणांना अप्रिय वाटत आहे . या प्रश्नाला  वाचा फोडणार्यांना अखेर त्यांना कार्यमुक्त व्हावे लागले . जे माझ्या मते अत्यंत अयोग्य आहे . माणसाला जगायला भाकरीच लागते भाव भावनांवर माणसाचे पालन पोषण माझ्या मते तरी शक्य नाहि . जर सद्यस्थितीत महाराष्ट्राचा विकास त्याचा मोठ्या  आकारामुळे होत नसेल तर त्याचे 2(विदर्भ +महाराष्ट्र ) /3(विदर्भ +मराठवाडा+ महाराष्ट्र )/4 किंवा काय पाहिजे तितके तूकडे करायला माझे समर्थन आहे . काहि लोकाच्या भावनेच्या पोटी जावून प्रदेशाचा  विकास जर थांबत असेल तर त्या भावनांना किंमत न देणेच योग्य ठरेल . मला महाराष्ट्रातील 108हूताम्यांविषयी पुरेपूर आदर आहेच . पण त्याचे भांडवल करत   एखाद्या प्रदेशाला अविकसीत म्हणून ठेवायला विरोध आहे . जर तूम्हाला महाराष्ट्र अखंडच ठेवायचा असेल तर हे प्रदेश मागे का राहिले याचा विचार करायलाच पाहिजे आणि त्यांना विकासाबाबत बरोबरीने आणणे आवश्यक आहे . जर हे शक्य नसेल तर वेगळे होण्यात ...

जागतिक वन दिवसाच्या निमित्याने

जागतिक वन दिवसाच्या निमित्याने सध्याच्या प्रचंड तापमानाच्या काळात आपणास एकच चर्चा ऐकू येते झाडे लावली पाहिजेत झाडे लावली पाहिजेत . झाडांमुळे पर्यावरणाचा समतोल टिकतो पर्यायाने हवेत गारवा टिकून रहातो ही या मागची कल्पना आहे . मानवास हे वृक्षांचे महत्व फार आधीच समजले होते . त्या अनूषंगाने मानवाने पाउले देखील टाकण्यास सुरवात केली होती . त्याचीच फलनिष्पती म्हणजे जागतिक वन दिवस . जो आपण 21 मार्च रोजी साजरा करतो . मानवी आयुष्यात वनांचे महत्व किती आहे हे आपणास तुकोबाराय आदी संताच्या अभंगातून लक्षात येतेच . संतांनी सांगितलेले हे  वृक्षांचे महत्व  आपण अनूभवू पण शकतो उदाहरणार्थ महाराष्ट्रातील महत्तवाची समजणारी जाणारी पुणे आणि नाशिक ही शहरं घेयुया  पुणे आणि नाशिक दोन्ही समान शहरे किंबहूना पुणे अधिक जलदचं या दोन्ही शहरातून फेरफटका मारल्यास आपणास काय जाणवते ? नाशकात आपणास अधिक उन जाणवते त्या तूलनेत पुण्यात उन कमी जाणवते  पुणे अधिक प्रमाणात  ग्रीन हाउस गँसेसचे उत्सर्जन करत असून देखील आपणास हा फरक जाणवतो  . याचा मागचा कारणाचा शोध घेतला असता आपणास दिसते की पुण्याच्या आ...

लोणार मी बघीतलेले

इमेज
लोणार मी बघीतलेले आजच  दिनांक 20मार्च 2016 पञ नव्हे स्मार्ट मिञ असे घोषवाक्य असणार्या एका दैनिकात लोणार विषयक लेखन वाचले अन माझे मन  लोणारला केलेल्या सहली आठवायला लागले. मी आतापर्यत 4 ते5 वेळा लोणारला गेलोय . दर वेळी लोणारला काही बदल झालेले दिसले काहि बदल सकारात्मक होते , काहि नकारात्मक होते असो मी इयत्ता आठवीत असताना सर्वप्रथम लोणारला गेलो . ते खगोल मंडळ या संस्थेमार्फत (ही पोस्ट वाचणार्रापैकी काहि लोकांना मी या संस्थेबरोबर सोमेश्वर धावत्या (धबधब्याचे छोटेरुप म्हणजे धावत्या  ) नाशिक  येथे केलेले आकाशदर्शन आठवू शकते ) नंतर परत एकदा याच संस्थेबरोबर गेलो . नंतर स्वतंञ ही गेलो . लोणारला प्रसिध्द असणार्या मुख्य सरोवराबरोबर गणेश तळे आणि अंबर तळे ही दोन छोटी सरोवरे देखील आहेत . त्याचा निर्मितीकाळ देखील मुख्य सरोवराच्या समकालीन आहे . तसेच प्रचंड मँगेंटीक पॉवर असलेली की ज्यामुळे चुंबकीय सुई देखील विचलीत होते अशी हनुमानाची उत्तर दक्षीण अशी झोपलेली मुर्ती पण लोणारचे आकर्षण आहे या मुर्तीला उभे करणे सोडाच पुर्व पश्चीम देखील कोणी करु शकत नाही भारतात  असणार्या काहि ...

उष्ण कोरड्या हवामानाचे भविष्य सामोरी

उष्ण कोरड्या हवामानाचे भविष्य सामोरी (जागतिक हवामान दिवसाच्या अनुषंगाने 23 मार्च ) सध्या सर्वांच्या तोंडी एकच वाक्य सदानकदाआपणास दिसते ते म्हणजे आमच्या लहानपाणी असे नव्हते आताचे हवामान खूपच लहरी झालंय कधीही पाउस कधिहि उन कधीही थंडी आणि तीही अतिशय कडक . सध्याचे हवामान फार झपाट्यान बदलतंय . तर या हवामानाचा अभ्यास केला जातो त्या शास्त्राला म्हणतात . "हवामान शास्त्र ' अथवा इंग्रजीत म्हणतात Meteorology /Climatology . . भुगोलाच्या ज्या दोन मुख्य शाखा मानल्या जातात प्राकृतिक भुगोल आणि मानवी भुगोल त्यातील प्राकृतिक भुगोल या मुख्य शाखेतील दुय्यम अभ्यास शाखा माञ सध्याच्या काळातील अत्यंत महत्तवाची अभ्यास शाखा म्हणजे हवामानशास्ञ होय . तर या हवामान शास्त्राची जगमान्य संस्था म्हणजे world meteorology organization ( www.wmo.int. ) ही होय . ही संस्था जगातील हवामानशास्ञातील संशोधनाची नोंद ठेवते . जगातील हवामानातिल बदलांची नोंद ठेवते . या संस्थेच्या ईसवी सन 1950 मध्ये भरलेल्या अधिवेशनात ठरल्याप्रमाणे 23 मार्च हा दिवस जागतिक हवामान दिवस म्हणून साजरा करण्यात येतो . हवामानशाशास्ञाची आणि मानवाच्...

विषवदिन विशेष

21 मार्चच्या अनुषंगाने समसमान आम्ही दोघे म्हणती दिन राञ पृथ्वी सुर्या भोवती फिरते  हे आता जगमान्य झाले आहे . याचा आपल्याला दिसणारे दृश्यपरिणाम म्हणजे आपल्याला दिसणारे सुर्याचा उदयाचे रोज बदणारे स्थान .  धोबळ मनाने आपण सूर्य पुर्वेला उगवतो असे मानतो पण शास्ञीय दृष्ट्या विचार केला असता वर्षातील फक्त दोन दिवस असे असतात ज्या दिवशी सुर्य वास्तविक पुर्व दिशेला उगवतो . अन्य दिवशी तो वास्तविक पुर्व दिशेपासून काहि अंश उजवीकडे अथवा डावीकडे उगवतो .ते दोन दिवस म्हणजे 21 मार्च आणि 22 सप्टेंबर .            सुर्याभोवती पृथ्वी फिरत असल्यामुळे आपणास सुर्यच फिरत  आहे असे वाटते .आपण त्यास सुर्याचे भासमान भ्रमण म्हणू या . तर हे सुर्याचे भासमान भ्रमण  होते  पृथ्वीवरच्या मध्यापासून अर्थात  विषवृतापासून उजवीकडे आणि डावीकडे साडे तेवीस अंशापर्यत जेव्हा हा सुर्य त्याचा भासमान भ्रमणात सुर्य विषवृतावर असतो .त्यादिवसी दिनमान आणि रात्रीचा कालावधी समान असतो . जो१२ १२तासांचा असतो वर्षातून असे दोन दिवस असतात ते म्हणजे 21 मार्च आणि 22...

गुरुदत्त 3 अंकी शोकांतिका

इमेज
पुस्तकाचे नाव - गुरुदत्त 3 अंकी शोकांतिका -लेखन - अरुण खोपकर -प्रकाशक -ग्रंथाली प्रकाशन मुल्य - 450 ₹ नुकतेच मी भारतीय चिञपट सृष्टीतील अत्यंत महत्तवाचे म्हणून ज्यांचे नाव घ्यावेच लागेल अश्या गुरुदत्त यांच्या जिवनावर आधारलेले  गुरुदत्त  3 अंकी शोकांतिका हे पुस्तक वाचले पुस्तक साहित्य अकादमीच्या 2016 चे पुरस्कार विजेते ज्येष्ठ सिने परीक्षक , कथालेखनकार भारतीय चिञपटसृष्टीघे जाणकार म्हणून भारताला परिचीत असणार्या श्री अरूण खोपकर यांनी लिहलेले  आहे  आणि ग्रंथाली प्रकाशनाने प्रकाशित केलेले आहे पुस्तकात गुरुदत्त यांच्या वैयक्तिक आयुष्याबाबत उहापोह न करता त्यांच्मा चिञपट निर्मितिच्या अंगाबाबत यामध्ये भाष्य केले आहे .  भाष्य करताना अन्य चिञपट निर्मात्याच्या अनुषंगाने गुरुदत्त कसे डावे अथवा उजवे ठरतात यावर सांगितलेले आहे . विषय कठिण असला तरी वापरलेली भाषा खुप सहज सोपी असल्याने पुस्तक रंजक झाले आहे . जे वाचतांना पहिल्यापासून पकड घेते                आणि म्हणूनच असेल कदाचित या मुळच्या मराठी पुस्तकाच...

मराठी पाउल पडते कुठे ?

इमेज
कोणतीही गोष्ट जर वापरात नसेल तर कालांतराने ती गोष्ट बंद नष्ट होते ,अथवा बंद होते . पुर्वी मानवास शेपटी होती तिचा वापर न केल्याने ती झडुन गेली आणि त्याची निशाणी म्हणून निव्वळ माकडहाड राहिले . पोस्टाची एके काळची महत्वाची सेवा असलेल्या तारसेवेचा उपयोग कमी कमी होत गेला . परिणामी टपाल खात्याने तिलाच रामराम ठोकला . या पुर्वी जगात अनेक गोष्टी बंद झाल्या आहेत . त्यात अजून एका गोष्टीची भर पडणार का ? अशा प्रश्न आज मला एटिम मधून पैसे काढताना पडला त्यासाठीच आजचा हा पञप्रसंग त्याचे असे झाले की काहि कारणा निमित्याने पैसै काढण्यासाठी एटीम मध्ये गेलो असता मी कार्ड मशिनमध्ये घातल्यावर  भाषा म्हणून मराठि निवडली खरी माञ पुढे काहिच कार्यवाहि होइना त्या मशिनमध्ये फक्त दाखवायला मराठी भाषेचा पर्याय दिला होता माञ त्याचा पुढिल संगणकिय प्रोग्रामच लिहला नव्हता . कारण काय असेल त्याचे ? वापरणारेच नाहीत तर कशाला उगिच लिहायचा . हेच असणार ना त्या मागचे कारण . म्हणजेच त्या मशिन पुरती मराठी बंद , वापरा हिंदी अथवा इंग्रजी  . आपल्या मराठीत एक म्हण आहे थेंबे थेंबे तळे साचे . याचा अर्थ थोड थोड करतं गेल्यास ख...

याकडं बी ध्यान असू द्या !

गेल्या 2/3 दिवसातील महत्वाची पण मराठी माध्यमांतून काहीसी निसटलेली म्हणजे युनाटेड नेशन्स (हे माझ्यामते विशेष नाव आहे आणी विशेष नामाचे भाषांतर होत नाही त्यामुळे प्रचलीत असले तरी मराठी नाव वापरल नाही ) मध्ये सुरु असलेली परीषद ज्यामध्ये सिक्यूरिटी कौन्सिल मध्ये बदल घडवण्यासाठी चर्चा होणे अपेक्षीत आहे या बदलामध्ये भारत जपान जर्मनी आणी ब्राझील या जी 4 सदस्य राष्ट्रांना सिक्युरिटी कौन्सिल मध्ये पर्मनंट सिट विथ व्हेटो मिळण्याची शक्यता आहे . माञ या बाबत काही विशेष चर्चा आपल्या माध्यमात होताना दिसत नाहीये . असो जेव्हा याची अधिक्रुत घोषणा होइल तेव्हा होइलच . जगातील बहूसंख्य देश भारताकडे मोठ्या आशेने बघतात . जेव्हा आपण नामचे सक्रीय सदस्य होतो तेव्हा अनेक राष्ट्रे युनाटेड नेशन्समध्ये चर्चेला आलेल्या मुद्यावर भारताचा भुमिकेला सहजतेने पाठिंबा देत . भारताने नेहमीच शांतता सैन्यात महत्वाची भुमिका बजावली आहेच . तर सांगायचा मुद्दा अशा की त्यामुळे जगात भारताची प्रतिष्ठा वाढेल . काश्मीर सारख्या मुद्यावर ठोस भुमिका घेणे त्यामुळे शक्य होईल . माञ याला चीन काही प्रमाणात खोडा घालू शकतोस. भारताला हे तर पाकिस्तान...

मराठी भाषेची सुंदरता

इमेज
मराठी भाषेची सुंदरता 👌 खालील कवितेत २६ वेळा पाणी शब्द आला आहे व वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येकवेळी पाणी या शब्दाचे विविध अर्थ उलगडतात. ही आहे मराठी भाषेची श्रीमंती. मराठी राज्यभाषा झाली तर अशा समृद्धतेने नटलेल्या भाषेचे आपण पाईक होऊन समृद्ध संस्कृतीचे जोपासक होऊ. रंग पाण्याचे 'पाणी'शब्द हा असे प्रवाही वळवू तिकडे वळतो हा जशी भावना मनात असते रूप बदलते कसे पहा नयनामध्ये येते'पाणी' अश्रू तयाला म्हणती कधी सुखाचे,दुःखाचे कधी अशी तयांची महती चटकदार तो पदार्थ दिसता तोंडाला या'पाणी'सुटते खाता खाता ठसका लागून डोळ्यांतून मग 'पाणी' येते धनाढ्याघरी लक्ष्मी देवी म्हणती अविरत 'पाणी'भरते ताकदीहूनी वित्त खर्चिता डोक्यावरूनी 'पाणी'जाते वळणाचे 'पाणी' वळणावरती म्हण मराठी एक असे बारा गांवचे 'पाणी' प्याला चतुराई यातूनी दिसे लाथ मारूनी'पाणी'काढणे लक्षण हे तर कर्तृत्वाचे मेहनतीवर 'पाणी' पडणे चीज न होणे कष्टाचे उत्कर्ष दुज्याचा मनी डाचतो 'पाण्या'त पाहणे गुण खोटा 'पाणी'दार ते नेत्र सांगती विद्वत्तेचा गुण मोठा शिवरायांन...

मराठी जन कधी हे करणार ?

इमेज
मी नूकताच नॉथ वेस्ट कनार्टक स्टेट रोड ट्रान्सपोर्टचा बसने (खरेतर ज्या भागाला बॉम्बे कर्नाटक म्हणतात त्या भागाचा स्टेट टान्सपोर्ट ला नाव माञ नॉर्थ वेस्ट हे नाव. मराठी भाषिकांचा जखमेवर मिठ चोळणे दुसरे काय ? ) नाशिक पुणे प्रवास केला . या बसचे आरक्षण करण्यासाठी मी जेव्हा त्याचा वेबसाईट वर गेलो असता मला आढळलेल्या बाबींसाठी हा लेखनप्रपंच मला आढळलेली महत्वाची गोष्ट म्हणजे त्या व्यक्तींचे भाषाप्रेम त्यांची वेबसाईट पहिल्यांदा उघडते त्याचा भाषेत . साईट उघडल्यावर कोपर्यात बारीक अक्षरात त्याची इंग्रजी लिंक दिसते . किती अत्युच्य दर्जाचे हे भाषाप्रेम ! याउलट मराठी जन . माझ्या वैयक्तीक संपर्कात अश्या पंचवीस एक व्यक्ती आहेत ज्यांची मातृभाषा खरतर मराठी , पण मी मराठीत लिहणार्या पोस्टला सुध्दा इंग्रजीत प्रतीसाद देताय .याबाबबत त्यांना विचारले की इंग्रजी ही जगाची भाषा आहे आमचे स्वातंञ्य अशी उत्तरे देतात मला त्या सर्वांना विचारायचे आहे की मराठीत अभिव्यक्त न होण्याचा आणी इंग्रजी येण्याचा संबध तो काय . दाक्षीणात्य व्यक्तींचे इंग्रजी मराठी व्यक्तींपेक्षा सहस्ञ पटीने उत्तम असते माञ ते व्यक्त होतात त्याचाच मा...