पोस्ट्स

सप्टेंबर, २०१५ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

11 सप्टेंबर

इमेज
वर्षातील काही तारखा अत्यंत विलक्षण असतात . त्यातलीच एक म्हणजे 11 सप्टेंबर .ही तारीख दोन कारणाने विलक्षण ठरते एक म्हणजे 11सप्टेंबर 1893 या दिवशी स्वामी विवेकानंद यांनी केलेले शिकागो येथे केलेले सुप्रसिध्द भाषण ज्यामुळे वैदीक संस्क्रुतीला एक वेगळी अशी ओळख जगभरात प्राप्त झाली . आणी दुसरी म्हणजे न्यूयॉक येथील वल्ड ट्रेड वरील हल्ला .दोन्ही घटना युनाटेड स्टेटस आॉफ अमेरीकेतील . दिवस ही सारखाच 11 सप्टेंबर . माञ एका घटनेने जगाला मानवतेचा महान संदेश दिला तर दुसर्या घटनेने कौर्याचा मानवास दु:खी करण्याचा संदेश दिला . कोणता योगायोग म्हणावे यास सुखद की दुखद . एका घटनेने पाश्चात्य देशांना पौवात्य देशातील ज्ञानचा अनूभव दिला तर दुसर्या घटनेने पौवात्य देशातील कौर्याचा अनुभव दिला . स्वामी विवेकानंद यांनी केलेल्या कार्यामुळे अनेकांना सुख शांती मिळाली तर दुसर्या घटनेने दैन दिले तारीख तीच 11 सप्टेंबर फक्त वर्ष बदलले एकाचे 1893 तर दूसर्याचे 2001 एक घटना अमेरीकेचा पुर्व किनार्यावर (शिकागो ) तर दुसरी पश्चीम किनार्यावर (न्यूयॉक ) एव्हढाच काय तो फरक .पण त्याचे किती वेगवेगळे परीणाम होतात असो स्वामी विवेकानंदांमु...

हे.पण घडत होतं!

गेल्या काही दिवसापासून नवी मुंबई परीसराात आईनचततघडवून आणलेल्या हत्येच्या बातम्यांना आपण परीचीत असालच . माञ जगातच काय आपल्या भारतातच अनेक महत्वाचा घटना त्यावेळी घडत होत्या. आणी घडत आहेय ज्याचे अत्यंत दुरगामी परीणाम होणार आहेत . भारताच्या ईशान्य भागात असणार्या "मणीपुर " या राज्यात घडणार्या घटनाही याच मालीकेतील आहेत . आणी या घटना कधी घडता आहेत .तर मणीपुर च्या उत्तरेला असणार्या नागालँड राज्यात शांतता निर्माण करण्यासाठी सरकार विशेष प्रयत्न करत असताना हे घडत आहे . मणीपुर या राज्याशी उर्वरीत भारताशी संबध येतो तो प्रामुख्याने नागालँड मधून जाणार्या राष्ट्रीय महामार्गाचा माध्यमातून .मागे काही वर्षापुर्वी नागालँड मध्ये अशांतता निर्माण झाल्यावर पेट्रोलचे भाव सातव्या आसमानच्या सातव्या आसमानला पोहचले होते . तेथील रॉबीन हूड समजल्या जाणार्या व्यक्तीचे शव तेथील समाज शासनाकडे माडलेल्या मागण्या मान्य होण्यापर्यत स्विकारण्यास देखील तयार नव्हता .आता तेथील परीस्थिती निवळत आहे . तर याच मणीपुरच्या एका बाजूला असणार्या आसाम मध्ये गंभीर पुरस्थिती निर्माण होत आहे .आपल्याकडे अष्टभगीनी विषयी बातम्या तश्य...

कुणी तरी शिकवा रे बाबा यांना !

3 सप्टेबर 2015ची गोष्ट आहे ही .टिव्ही बघत असताना आग्येय आशियाई देशातील महत्वाची व्रुतवाहिनी असणार्या "चँनेल न्यूज आशिया "वर चालू असणारा एक चर्चेचा कार्यक्रम बघण्याचा योग आला . आणी मी उडालोच .अँकर सर्व वक्त्यांना व्यवस्थीत न अडवता बोलू देत होता , अँकर ही ओरडत नव्हता . चर्चेसाठी बोलवण्यात आलेल्या व्यक्ती दूसर्याला पुर्ण बोलू देत होत्या . अँकर ही हात जोर् जोरात हलवून यू मिस्टर अर्णब वगैरे बोलत नव्हता . ते द्रुष्य बघून मला वाटले किती निरस चर्चा करताय हे लोक. त्यांना आपल्या भारतात आणून भारतीय व्रूत वाहिन्यांवर चर्चेचे शास्ञशुध्द प्रशिक्षण देण्याची नितांत गरज आहे आणी त्यातही त्यांना अर्णब सरांचा तालमीत दिले पाहिजे .चर्चा त्यातही केंद्रीय विधीमंडळाच्या निवडणूक अर्ज भरण्याचा दिवशी होणारी चर्चा( येत्या 13सप्टेंबरला सिंगापूरला त्यांचा पार्लीमेंटच्या सर्व 78 जागांसाठी50 वर्षात प्रथमच निवडणूक होणार आहे त्यासाठी 3सप्टेंबरला उमेदवार अर्ज भरत होते ) कशी व्हयला पाहीजे या बाबत अर्णब सराचा हात कोणी धरू शकणार नाही . त्या ठिकाणी अशी चर्चा म्हणजे एकदम पाणचट असे मला वाटते .तूम्हाला काय वाटते . बि...

माझे सिहस्थ वार्तांकनाचे हकीकत

गेल्या शनिवारी म्हणजेच 29आॉगस्ट ला मला ञ्यंबकेश्वर येथे पहिल्या पर्वणीचे वार्तांकन करण्याची संधी मिळाली . फारच मस्त अनूभव होता . पहिल्यांदा दमल्याने नंतर व्हॉटसपमध्ये आणी फेसबुकमध्ये काही समस्या निर्माण झाल्याने माझे वार्तांकन करण्याचा अनुभव तुम्हाला सांगण्यास एव्हढा वेळ लागला . हा सिहस्थ माझ्या जन्मानंतरचा दूसरा पण वार्तांकन करण्याचा पहिलाच सिहस्थ होता .माझ्या मते पोलीसांनी थोडासा अतिरेक केला माझ्याकडे वार्तांकनाचा पास असला तरी मला सातपूरला ञास झाला .आता बघूया दुसर्या पर्वणी ला काय करताय ? मला हे माहीती आहे की लोक वार्तांकनाच्यावेळी काढलेले फोटो बघण्यास उत्सुक आहेत .त्यांची ईच्छ पुर्ण करेल . पुर्वी पुण्यातील गणपती उच्छवात सलग 21 तास गर्दिचे नियंञण केले होते . त्यामुळे राञभर जागण्याचा काही ञास झाला नाही . माञ ते स्वयंसेवक पध्दतीने होते . इथे मी वार्तांकन करत होतो . त्यामुळे थोडासा तणाव होताच . पण या तणावावर उत्साहाने मात करत एक मस्त अनुभव घेतला . प्रशासनाकडुन मला ईतर परीसराचा पास देण्यात आला आहे . तर माझ्या सहकार्याला कुशावर्ताचा पास देण्यात आलाय . ञ्यंबकेश्वर येथील लोक जरी उत्साह ...