दुसरी बाजू
सध्या नाशकात सर्वञ कुंभमेळ्याचीच चर्चा सुरु आहे . जे योग्य ही आहे . बारा वर्षांनी येणारा मोठा उत्सव आहे हा .तो मोठ्या प्रमाणात साजरा केला गेलाच पाहिजे यात वादच नाही . माञ त्या वेळेस सुध्दा आपली नजर भविष्याकडे असली पाहिजे . आज नाशकातील मोठ्या धूमधडाक्यात सुरु झालेले ग्रुह निर्माण प्रकल्प अडचणीत सापडले आहेत. ते भविष्यात मोठ्या समस्या निर्माण करू शकतात . घरांच्या किमती वाढल्यामुळे तेथील अनेक सदनिका विकल्या गेलेल्या नाहीत . या रिकाम्या पडलेल्या सदनिका भविष्यात येणार्या आर्थिक मंदीची तर चाहूल देत नाहीना ? याचा विचार करण्याची वेळ जवळ येत चालली आहे . एल बी टी अंशत: रद्द झाल्याने( एल बी टी सरसकट रद्द न होता विहीत रकक्मेपेक्षा अधिक उलाढाल असणार्याना असल्याने अंशत:) आता उत्पनाचा मुख्य स्ञोत खरेदी व्रिकी आहे तिथे अशी स्थिती असेल तर बघा सटवीच्या मनात काय काय योजना आहेत ? आधीच दुष्काळामुळे शेती फारशी उत्पन देणारी राहिलेली नाही . औद्योगिक क्षेञातही मन प्रसन्न ठेवणारी स्थिती आहे असे मला तरी वाटत नाही . नाशिक च्या सातपूर आणी अंबड या उपनगरातील औद्योगीक वसाहतीत नूसता फेरफटका मारला तरी परीस्थितीचा अंदाज...