पोस्ट्स

टोल नाका जीव वाचण्याचे साधन

इमेज
दिनांक 25 मे रोजी  पहाटे मुंबई  पुणे एक्सप्रेस हायवेवर पुण्यातील नामवंत बांधकाम व्यवसाईक दि एस कुलकर्णी यांच्या गाडीला अपघात झाला त्यात त्यांचा चालकाचा जागीच मृत्यू झाला .याच महामार्गावर भक्ती बर्वे आनंद अभ्यंकर यांचा मृत्यू झाला होता (आज भारतात सर्वाधिक मृत्यू हे हार्टफेल आणि रस्ते अपघात या दोन कारणाने होत आहेत . ) या अपघातामागे रस्त्याचा उभारणीतील दोषांचा उहापोह माध्यमांव्दारे होत आहेत . रस्ते उभारणीतील हे दोष दुरुस्त होतीलच पण त्याला काही कालावधी द्यावाच लागेल लगेच करायचे उपाय लक्षात घेतल्यास आपणास टोल नाक्याचे महत्व दूर्लक्षून चालणार नाही , आपणास दोन टोल नाक्यातील अंतर माहिती असतेच ते अंतर सूरक्षीत पणे पार करण्यासाठी किती वेळ लागेल हेही आपण सांगू शकतो . समजा तो कालावधी य आहे आता आपल्याला एकच करायचे .ते म्हणजे एका टोलनाक्यावरुन दूसर्या टोरलनाक्यावर जाण्यासाठी क्ष रुपये टोल  असेल तर य कालावधीत पोहचणार्या वाहनांना टोल मधून काही प्रमाणात सवलत द्यायची तर य कालावधी पेक्षा कमी काळात हे अंतर पार करण्यार्या वाहनांना क्ष या रक्कमेच्या चार ते पाच पट टोल भरायला लावल्यास लोक ...

जाने क्यू ?

इमेज
आपला भारत हा अनेक अजीब गोष्टिने भरलेला देश आहे व्यक्ती हा पण यातीलच एक घटक काय एक एक सॉलिड स्वाभावाचा गोष्टी असतात ! मला एटीम मशीनच्या वेळेस आणी किराणा दुकानात हा प्रकार खुप वेळेस अनुभवयाला मिळतो लोक कसेही दूसर्याचा विचार न करता उभे असतात पहिल्यांदा एटीम च्या विचार करू मला अनेकदा एटीम पाशी हा अनूभव आला आहे इतरांना हा अनुभव न आलेला असल्यास त्यांनी स्वत:पुण्यवान समझावे मी एटीम मधून पैसे काढताना बाहेर आल्यावर मला असे जाणवते की लोक अनेकदा दरवाज्यातच  उभे असतात जणू आतील व्यक्तीने उंच उडी मारुन बाहेर पडावे किवा त्या व्यक्ती हवेच्या असून सरळ चालत  गेले तर आपण त्या व्यक्तीमधून बाहेर पडू अशा या व्यक्तीचा समज का असतो कोण जाणे आतील व्यक्तीला बाहेर पण पडता येवू नये अश्या प्रकारे त्या त्या का उभे राहतात कोण जाणे इतरांना कदाचित चांगले अनूभव असतील माझा माञ या बाबतीत फारशा चांगला अनुभव नाही हे माञ नक्की मला येणारा दुसरा ञासदायक अनुभव म्हणजे किराणा दुकानाच्या कांउटरपाशी तिथे एकाव्यक्तीचे काम असते माञ काही काम नसताना लोक झुंडीने उभे असतात की नव्या माणसाला खुप गर्दी वाटून त्याने बाजूला उ...

माते नर्मदे

इमेज
नूकतेच मी ' दत्तप्रसाद दाभोळकर' लिखीत " माते नर्मदे "हे पुस्तक वाचले .पुस्तक सुप्रसिध्द "सरदार सरोवर " या विषयावर आधारीत असून पुस्तक सरदार सरोवराच्या बाजूने मतप्रदर्शन करते . जे मेधा पाटकर अमिर खान यांच्यख आंदोलनामुळेतयार झालेल्या  आपल्या पारंपारिक संकल्पनेला पुर्णपणे छेद देणारे आहे .  पुस्तकात अनेक आर्थिक संकल्पना , पर्यावरणीय संकल्पना स्पष्ट करून सांगितल्या असल्या तरी पुस्तकाची भाषा सहज सोपी वापरल्याने पुस्तक कंटाळवाणे न बनता रंजक झाले आहे . जे वाचताना सहजतेने ठाव घेते . पुस्तकाचा पाया ,हे धरण होणे पाश्च्यातांच्या आर्थिक साम्राजवादाचा पाया हलवणारे असल्याने ते पर्यावरणाचा बागुलबुवा उभा करत असून या संस्थांना परदेशी संस्थेकडून वित्तसाह्य होते हा आहे .जगात या पेक्षा मोठी धरणे झाली असून पाश्चात्य राष्ट्रात अनेक प्रकारे पर्यावरणाची हानी होते . माञ ती राष्ट्रे भारताला त्याच घटकाचा आधार घेत प्रगती करण्यापासून रोखतात .हा आहे . पुर्वी उभारलेले मोठे प्रकल्प हे खोरे निहाय अभ्यास करुन उभारलेले नसल्याने फारसे उपयोगी पडलेले नाहीत . नर्मदा नदीत सरदार सरोवरा अंतर्गत...

जागतिक कृषी पर्यटन दिना निमित्य

इमेज
जागतिक कृषी पर्यटन दिना निमित्य फिरायला कोणाला आवडत नाही ? आपल्यापैकी प्रत्येकजण कधीना कधी फिरायला गेलेला असतोच . कोणी धार्मिक दृष्टीने पुण्यसंचय करण्यसाठी  फिरतो . कोणी नविन अनुभव घेण्यासाठी फिरतो .कोणी स्वतःचे आरोग्य निरोगी राहावे , मन उठ्याहित राहावे म्हणून फिरतो . या विविध ऊद्देशातून त्याचे विविध प्रकार पडतात उदा वैद्यकीय पर्यटन , दुर्गभ्रमंती पर्यटन ,धार्मिक पर्यटन , यातीलच एक म्हणजे कृषी पर्यटन हा होय . याची जगात विविध भागात प्रकारे व्याख्या केली जाते .  या सर्व व्याख्यांचा सार काढल्यांस आपणास असे म्हणावे लागते की निसर्गासी साधात्म्य साधाणारे पर्यटन म्हणजे कृषी पर्यटन होय  आपल्या भारतात जवळजवळ 65% भाग ग्रामीण आहे . आपल्या भारताची खरी ओळख होते ती ग्रामीण भागातून या ग्रामीण जिवनाची ओळख करुन घेण्यासाठी केले जाणारे पर्यटन म्हणजे कृषी पर्यटन .. तर या ग्रामीण भारतासाठी केले जाणारे कृषी पर्यटन जगाला समजावे म्हणून एका विशेष मोहिमे अंतर्गत Agri Tourism  Development cooperation  ( ATDC )या संस्थेमार्फत ईसवी सन 2008पासून साजरा करण्यात येणारा दिवस म्हणजे जागतिक कृ...

जागतिक पुस्तक दिनाच्या निमित्याने

इमेज
आज २३ एप्रिल अर्थात जागतिक पुस्तक दिन इंग्रजी साहित्यातील एक महान साहित्यीक शेक्सपियर  याचा स्मरणार्थ हा दिवस साजरा केला जातो आज या साहित्यकाराची जयंती(Birth anniversary ) आणी पुण्यस्मरण (Death anniversary )दिवस सुध्दा आज पुस्तकाचे विश्व खुप मोठ्या प्रमाणात विस्तारले आहे अॉडीयो बूक ई बुक्स किंवा पारंपारिक छापील पुस्तके आदी प्रकारात सध्या  सध्या पुस्तके वाचायला उपल्बध आहेत पुर्वी न चर्चिल्या गेलेल्या अनेक विषयावर सध्या पूस्तके निघत आहेत मराठीच्या संदर्भात बोलायचे झाल्यास नॉनफिक्शन (मराठीत ज्याला ललीत साहित्य म्हणतात) पुस्तकांचे विश्व फिक्शन  ( मराठीत ज्याला वाङमय साहित्य म्हणतात )पुस्तकांपेक्षा अधिक प्रमाणात विस्तारत आहे मराठीत अॉडीयो बुक हा प्रकार अजून तरी फारसा प्रचलीत नाही असे माझे निरीक्षण आहे माझे निरीक्षण परीपूर्ण असेलच असे नाही त्याच प्रमाणे ईबुक हा प्रकार सुध्दा मराठीत स्थिरावतो आहे पुस्तकांचे विश्व खरोखरच अनभूत आहे त्यातील मजा औरच आहे अनेक प्रसिध्द व्यक्तीनी त्याचा वाटचालीत पुस्तकांचे महत्व सांगितलेलच आहे  तर पुन्हा एकदा जागतिक पुस्तक दिनाचा शुभेच्छा दे...

मानसिक आरोग्य एक दृलक्षीत घटक

इमेज
मानसिक आरोग्य एक दृलाक्षित घटक सध्याच्या काळातील अत्यंत ज्वलंत विषय म्हणजे मानसिक आरोग्य हा होय .सध्याच्या अत्यंत ताण तणावाच्या काळात ज्या कोणत्या प्रकारच्या विकाराने सर्वाधिक लोक पिडीत असतील तर ते आहेत विविध मानसिक रोग . मी विविध हा शब्द वापरतोय . हे लक्षात घ्या , कारण सर्वसाधारणपणे मानसिक रोग म्हंटले की फक्त छिन्नमानसिकता ( स्कीझोफेनिया ) हाच रोग लोकांच्या नजरेस येतो . बाकीचे काही रोग हे मानसिक रोग आहेत हेच त्यांचा लक्षात येत नाही. अनेक मानसिक समस्या या विक्षिप्त स्वभाव या सदराखाली झाकल्या जातात ज्याच्यावर उपचार केल्यास त्या सहज बऱ्या होऊ शकणाऱ्या असतात मानसिक आरोग्याबाबत लोकांच्या  गैरसमज म्हणजे समुपदेशक (consular ) आणि मनोसोपचार तज्ञ यात होणारी लोकांची गलत . लोकानां दोघांतील फरकच सहज माहिती नसतो . लोक दोघाना एकेच समजतात .मानसोपचार तज्ञ हे एम बी बी एस + एम दि सायको हे क्षिक्षण झालेले असतात .आणि वैद्यकीय औषध तेच देवू शकतात समुपदेशकांना औषधाबाबत काहीच अधिकार नसतात तर समुपदेशक समुपदेशनाच्या कोर्स झालेले असतात मुख्यत: हा कोर्स एम ए मानाशात्र झालेले करतात मानसिक रोगांच्य...

भ फक्त आणि फक्त भाकरीचा भावनेचा कदापि नव्हे

इमेज
सध्या नागपुरी वडाभात खाणार्या काहि व्यक्तींच्या मतांमुळे मराठी जगत ढवळून निघत आहे . महाराष्ट्राच्या विभाजनासंबधी त्यांनी सांगितलेली मते काहि जणांना अप्रिय वाटत आहे . या प्रश्नाला  वाचा फोडणार्यांना अखेर त्यांना कार्यमुक्त व्हावे लागले . जे माझ्या मते अत्यंत अयोग्य आहे . माणसाला जगायला भाकरीच लागते भाव भावनांवर माणसाचे पालन पोषण माझ्या मते तरी शक्य नाहि . जर सद्यस्थितीत महाराष्ट्राचा विकास त्याचा मोठ्या  आकारामुळे होत नसेल तर त्याचे 2(विदर्भ +महाराष्ट्र ) /3(विदर्भ +मराठवाडा+ महाराष्ट्र )/4 किंवा काय पाहिजे तितके तूकडे करायला माझे समर्थन आहे . काहि लोकाच्या भावनेच्या पोटी जावून प्रदेशाचा  विकास जर थांबत असेल तर त्या भावनांना किंमत न देणेच योग्य ठरेल . मला महाराष्ट्रातील 108हूताम्यांविषयी पुरेपूर आदर आहेच . पण त्याचे भांडवल करत   एखाद्या प्रदेशाला अविकसीत म्हणून ठेवायला विरोध आहे . जर तूम्हाला महाराष्ट्र अखंडच ठेवायचा असेल तर हे प्रदेश मागे का राहिले याचा विचार करायलाच पाहिजे आणि त्यांना विकासाबाबत बरोबरीने आणणे आवश्यक आहे . जर हे शक्य नसेल तर वेगळे होण्यात ...