पोस्ट्स

ये आनंद तो गुजर चूका !

इमेज
राजेश खन्ना (ज्यांचा अंत फार वेदनादायक झाला )आणी अमिताभ बच्चन यांचा एक अजरामर जिवनाकडे नव्या द्रुष्टीने पहायला शिकवणारा चिञपट म्हणजे आनंद . या चिञपटाच्या अखेरीस अमिताभ बच्चन यांच्या तोंडी एक वाक्य आहे ." आनंद मरा नही ! आनंद मरते नही ! पण अमिताभ बच्चन यांना  वाईन कँपिटल आँफ इंडीया मध्ये आनंद या नावाशी साधम्य साधणारे चिञपट ग्रुह आहे . हे कदाचित माहीती नसावे . कारण ये पुलीस स्टेशन हे ! तुम्हारा बाप का घर नही असे ठणकावून सांगणार्या या अभिनेत्याने नाहीतर  हे सांगताना विचार  केला असता , की आपला आनंद अमर आहे पण जगातील सर्व आनंद अमर नाहीत . काही आनंद नावाशी साधम्य असणार्या चिञपटग्रुहाना  सरकारी अनास्थेमुळे अंतकाळ बघावा लागू शकतो . ज्यात नाशिकच्या विजयानद नावाच्या चिञपटग्रुहाचा पण समावेश आता होण्याची शक्यता आहे . याच विजयानंद मध्ये बालगंधर्व यांच्या नाटकाचा प्रयोग सूरू असताना औरंगाबाद उर्फ दाराशुकरोबाद उर्फ संभाजीनगर उर्फ खडकी या शहरातून आलेल्या एका अनंत कान्हेरे नावाच्या विशीतील तरुणाने तत्कालीन नाशिकचा जिल्हाधीकारी जँक्सन  जो स्वत: संस्क्रुत चा जाणकार होता त्याचा व...

25 वर्षानंतर

इमेज
या आठवड्यात एका मोठ्या घटनेस जीने जागतीक राजकारणात अमुलाग्र बदल केले , त्या घटनेस 25 वर्षे पुर्ण झाली . ती घटना म्हणजे पुर्व आणी पश्चीम जर्मनीचे एकञीकरण बर्लीनची ती ऐताहासिक भिंत पडणे . तसे बघायला गेले तर या घटनेचा आधीच्या दोन वर्षापासून जगात अनेक महत्वाचा घटना घडत होत्या . मग ते तिआनमेन चौकातील लोकशाही बाबतचे आंदोलन असो . किंवा त्यानंतर झालेले सेव्हीयत सोशालिस्ट रशियाचे पतन असो सारेच जागतीक राजकारण ढवळून काढणारे . (अर्थात भारतात काही वेगळी स्थिती नव्हती मंडल की कमंडलू हा वाद सर्वप्रथम याच काळात सुरु झाला . जो आतापरत सुरु होण्याची चिन्हे दिसत आहेत हार्दीक पटेल आणी काही संघटनांमुळे ,असो .) सध्या जग ज्या दहशतवादाने ग्रासले आहे त्या धार्मिक दहशतवादाची निर्मितीची सुरवात देखील याच काळाची . युनाटेड स्टेटस आँफ अमेरीकेची हूकुमशाहीपण याच काळात सूरू झाली , असो . भांडवलशाहीप्रधान पश्चीम जर्मनी विकसीत तर साम्यवादी विचारसरणीचा पूर्व जर्मनी अविकसीत . अश्या स्थितीत दोन्ही भागाचा विकास साधत आजचा जर्मनी उभा आहे . ज्याने पिग्स देशांच्या संकटातून यूरोपिय युनियनला वाचवण्याचे काम केले आणी आता भारताबरोबर ज...

11 सप्टेंबर

इमेज
वर्षातील काही तारखा अत्यंत विलक्षण असतात . त्यातलीच एक म्हणजे 11 सप्टेंबर .ही तारीख दोन कारणाने विलक्षण ठरते एक म्हणजे 11सप्टेंबर 1893 या दिवशी स्वामी विवेकानंद यांनी केलेले शिकागो येथे केलेले सुप्रसिध्द भाषण ज्यामुळे वैदीक संस्क्रुतीला एक वेगळी अशी ओळख जगभरात प्राप्त झाली . आणी दुसरी म्हणजे न्यूयॉक येथील वल्ड ट्रेड वरील हल्ला .दोन्ही घटना युनाटेड स्टेटस आॉफ अमेरीकेतील . दिवस ही सारखाच 11 सप्टेंबर . माञ एका घटनेने जगाला मानवतेचा महान संदेश दिला तर दुसर्या घटनेने कौर्याचा मानवास दु:खी करण्याचा संदेश दिला . कोणता योगायोग म्हणावे यास सुखद की दुखद . एका घटनेने पाश्चात्य देशांना पौवात्य देशातील ज्ञानचा अनूभव दिला तर दुसर्या घटनेने पौवात्य देशातील कौर्याचा अनुभव दिला . स्वामी विवेकानंद यांनी केलेल्या कार्यामुळे अनेकांना सुख शांती मिळाली तर दुसर्या घटनेने दैन दिले तारीख तीच 11 सप्टेंबर फक्त वर्ष बदलले एकाचे 1893 तर दूसर्याचे 2001 एक घटना अमेरीकेचा पुर्व किनार्यावर (शिकागो ) तर दुसरी पश्चीम किनार्यावर (न्यूयॉक ) एव्हढाच काय तो फरक .पण त्याचे किती वेगवेगळे परीणाम होतात असो स्वामी विवेकानंदांमु...

हे.पण घडत होतं!

गेल्या काही दिवसापासून नवी मुंबई परीसराात आईनचततघडवून आणलेल्या हत्येच्या बातम्यांना आपण परीचीत असालच . माञ जगातच काय आपल्या भारतातच अनेक महत्वाचा घटना त्यावेळी घडत होत्या. आणी घडत आहेय ज्याचे अत्यंत दुरगामी परीणाम होणार आहेत . भारताच्या ईशान्य भागात असणार्या "मणीपुर " या राज्यात घडणार्या घटनाही याच मालीकेतील आहेत . आणी या घटना कधी घडता आहेत .तर मणीपुर च्या उत्तरेला असणार्या नागालँड राज्यात शांतता निर्माण करण्यासाठी सरकार विशेष प्रयत्न करत असताना हे घडत आहे . मणीपुर या राज्याशी उर्वरीत भारताशी संबध येतो तो प्रामुख्याने नागालँड मधून जाणार्या राष्ट्रीय महामार्गाचा माध्यमातून .मागे काही वर्षापुर्वी नागालँड मध्ये अशांतता निर्माण झाल्यावर पेट्रोलचे भाव सातव्या आसमानच्या सातव्या आसमानला पोहचले होते . तेथील रॉबीन हूड समजल्या जाणार्या व्यक्तीचे शव तेथील समाज शासनाकडे माडलेल्या मागण्या मान्य होण्यापर्यत स्विकारण्यास देखील तयार नव्हता .आता तेथील परीस्थिती निवळत आहे . तर याच मणीपुरच्या एका बाजूला असणार्या आसाम मध्ये गंभीर पुरस्थिती निर्माण होत आहे .आपल्याकडे अष्टभगीनी विषयी बातम्या तश्य...

कुणी तरी शिकवा रे बाबा यांना !

3 सप्टेबर 2015ची गोष्ट आहे ही .टिव्ही बघत असताना आग्येय आशियाई देशातील महत्वाची व्रुतवाहिनी असणार्या "चँनेल न्यूज आशिया "वर चालू असणारा एक चर्चेचा कार्यक्रम बघण्याचा योग आला . आणी मी उडालोच .अँकर सर्व वक्त्यांना व्यवस्थीत न अडवता बोलू देत होता , अँकर ही ओरडत नव्हता . चर्चेसाठी बोलवण्यात आलेल्या व्यक्ती दूसर्याला पुर्ण बोलू देत होत्या . अँकर ही हात जोर् जोरात हलवून यू मिस्टर अर्णब वगैरे बोलत नव्हता . ते द्रुष्य बघून मला वाटले किती निरस चर्चा करताय हे लोक. त्यांना आपल्या भारतात आणून भारतीय व्रूत वाहिन्यांवर चर्चेचे शास्ञशुध्द प्रशिक्षण देण्याची नितांत गरज आहे आणी त्यातही त्यांना अर्णब सरांचा तालमीत दिले पाहिजे .चर्चा त्यातही केंद्रीय विधीमंडळाच्या निवडणूक अर्ज भरण्याचा दिवशी होणारी चर्चा( येत्या 13सप्टेंबरला सिंगापूरला त्यांचा पार्लीमेंटच्या सर्व 78 जागांसाठी50 वर्षात प्रथमच निवडणूक होणार आहे त्यासाठी 3सप्टेंबरला उमेदवार अर्ज भरत होते ) कशी व्हयला पाहीजे या बाबत अर्णब सराचा हात कोणी धरू शकणार नाही . त्या ठिकाणी अशी चर्चा म्हणजे एकदम पाणचट असे मला वाटते .तूम्हाला काय वाटते . बि...

माझे सिहस्थ वार्तांकनाचे हकीकत

गेल्या शनिवारी म्हणजेच 29आॉगस्ट ला मला ञ्यंबकेश्वर येथे पहिल्या पर्वणीचे वार्तांकन करण्याची संधी मिळाली . फारच मस्त अनूभव होता . पहिल्यांदा दमल्याने नंतर व्हॉटसपमध्ये आणी फेसबुकमध्ये काही समस्या निर्माण झाल्याने माझे वार्तांकन करण्याचा अनुभव तुम्हाला सांगण्यास एव्हढा वेळ लागला . हा सिहस्थ माझ्या जन्मानंतरचा दूसरा पण वार्तांकन करण्याचा पहिलाच सिहस्थ होता .माझ्या मते पोलीसांनी थोडासा अतिरेक केला माझ्याकडे वार्तांकनाचा पास असला तरी मला सातपूरला ञास झाला .आता बघूया दुसर्या पर्वणी ला काय करताय ? मला हे माहीती आहे की लोक वार्तांकनाच्यावेळी काढलेले फोटो बघण्यास उत्सुक आहेत .त्यांची ईच्छ पुर्ण करेल . पुर्वी पुण्यातील गणपती उच्छवात सलग 21 तास गर्दिचे नियंञण केले होते . त्यामुळे राञभर जागण्याचा काही ञास झाला नाही . माञ ते स्वयंसेवक पध्दतीने होते . इथे मी वार्तांकन करत होतो . त्यामुळे थोडासा तणाव होताच . पण या तणावावर उत्साहाने मात करत एक मस्त अनुभव घेतला . प्रशासनाकडुन मला ईतर परीसराचा पास देण्यात आला आहे . तर माझ्या सहकार्याला कुशावर्ताचा पास देण्यात आलाय . ञ्यंबकेश्वर येथील लोक जरी उत्साह ...

स्मार्ट फोन आणि मी

इमेज
स्मार्ट फोन आणी आपण आजकाल स्मार्टफोन ही निव्वळ श्रीमंताचा हातातील गोष्ट राहीली नाहीये .आता स्मार्टफोन सामान्याचा हातातील गोष्ट आहे . या स्मार्ट फोनचा वापर अनेक प्रकारे करता येतो . माञ आपण त्यापैकी किती प्रकारे करतो हे ज्याने त्याने स्वत:हून ठरवावे . स्मार्टफोन मधे आपण कोणती अँप वापरतो हे यासाठी बघणे अत्यंत आवश्यक आहे . निव्वळ सोशल मिडीया शी संबिधीत अशी अँप म्हणजे व्हॉयबर व्हॉटसप सारखी अँप वापरणेच म्हणजेच स्मार्टफोन वापरणे अशे नव्हे . अनेक अभ्यासपुरक अँप आहेत त्याचा वापर करून आपली प्रगती करू शकतो. अनोळख्या ठिकाणी अन्य कोणाला काही विचारण्यापेक्षा त्या त्या शहराचे अँप बघून आपण कुठेहि फिरु शकतो . तसेच आपण मनोरंजन सुध्दा करू शकतो . आपण कुठे प्रवासात अशलो तर आपली गाडी उशीरा आहे का ? किंवा आपल्या इच्छीत स्थळी जाण्यासाठी कोणकोणत्या गाड्या आहेत याची माहिती आपण घेवू शकतो . तसेच बँकेचे व्यवहार सुध्दा आपण स्मार्टफोनच्या माध्यामातून करू शकतो . आपण स्मार्टफोन वरुन MS OFFICE पण वापरू शकतो .थोडक्यात कॉम्प्यूटर वरुन करता येणारे सर्व कार्य स्मार्टफोन वरून करता येवू शकतात .माञ आधी सांगीतल्याप्रम्णे आपण ...